tag:blogger.com,1999:blog-21723236802665096572024-03-05T21:17:19.974+05:30आशयधनकेदारhttp://www.blogger.com/profile/14884011196968187595noreply@blogger.comBlogger12125tag:blogger.com,1999:blog-2172323680266509657.post-11346897846718129422013-03-25T15:22:00.001+05:302013-03-25T15:22:25.828+05:30पुन्हा होळी<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
उद्या होळी म्हणजे वाईट चालीरीती, वाईट कृत्य यांची होळी. पण हल्ली मला प्रश्न पडतो खरच होळी म्हणजे वाईटाची होळी कि निसर्गाच्या अद्वितीय संपत्तीची होळी. उद्या आता प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होणार. आधीच दुष्काळानं पोखरून टाकलेल्या ह्या महाराष्ट्र देशाला हे असं वृक्ष तोड किती परवडणारी आहे ह्याचा प्रत्येकानं विचार केला पाहिजे. आज दुष्काळामुळे जी परिस्थिती ओढावली आहे त्या करता कोण जबाबदार ह्या विषयावर चर्चा वाद विवाद करण्यापेक्षा प्राप्त परिस्थितीवर तोडगा काढुन भविष्यात पुन्हा हि परिस्थिती उद्भवणार नाहि ह्या करता विचार केला पाहिजे. आपण नुसतंच तोंडानं म्हणतो झाडे जगवा, झाडे वाचवा पण प्रत्यक्षात आपण ह्यातल काहिच आमलांत आणत नाहि. <br /><br />जसा काळ बदलतो तशा रुढि, परंपरा पण बदलायला पाहिजेत. सध्याच्या काळात होळी साजरी करण्याकरता दुसरा काहि पर्याय आहे का हे तपासून पाहिलं पाहिजे. आपल्या सभोवती अशा किती तरी गोष्टि सापडतील ज्याचा आपण होळीत जळणं म्हणुन उपयोग करू शकतो. चांगल्या डवरलेल्या झाडांच्या फांद्या तोडुन त्याची होळी करण हा नक्कीच योग्य पर्याय नाहि. आपण होळीची पूजा करतो म्हणजे एका अर्थानं त्याला देवच मानतो, मग ह्या दैवताला तरी मान्य असेल का कि त्यानेच निर्माण केलेल्या निसर्गाची आपण जाळुन राख करतो. वर्षभर आपण कितीतरी टाकाऊ माल जतन करू शकतो ज्याचा उपयोग आपण अशा प्रसंगांना जळणं म्हणुन करु शकतो. जेव्हा ह्या रुढि, हे सण अस्तित्वात आले किंवा सुरू झाले तेव्हाची परिस्थिती एकदम भिन्न होती. आपला देश निसर्ग संपन्न असा होता. <br /><br />प्रत्येक गल्लीबोळात होळी पेटवण्या पेक्षा एक गाव एक गणपती ह्या तत्त्वावर एक गाव एक होळी केली तरी आपण मोठ्या प्रमाणावर होणारा हा निसर्गाचा ह्रास थांबवु शकु. गावाकडे अजुनहि चूल पेटवण्याकरता गोवर्यांचा वापर केला जातो. आपणही ह्या पर्यायाचा विचार करायला हरकत नाहि. रोज आपण मोठ्या प्रमाणात पुठ्ठे, मोठे मोठे बॉक्सेस, कागदाचे चिटोरे कचर्यात टाकुन देतो, पण हेच आपण जर एखाद्या सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवल तरी त्याचा जळणं म्हणुन उपयोग करता येईल. पर्याय पुष्कळ आहेत पण ते अंमलात आणण खूप महत्त्वाचे आहे. <br />चला एकत्र येऊन संकल्प करुया निसर्गाचा ह्रास थांबवूया. </div>
केदारhttp://www.blogger.com/profile/14884011196968187595noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2172323680266509657.post-34911013806142205302012-12-12T14:11:00.002+05:302012-12-12T14:11:47.072+05:30अवयव दान<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
आज Times Of India ला एक वेगळीच बातमी वाचली. दिल्लीतील एका दांपत्यानं आपल्या मृत मुलाचे शक्य तेवढे अवयव दान केले. वाचुन अंगावर शहारा आला पण खरच किती छान कल्पना आहे. माणूस मेल्यावर त्याच शरीर नश्वर होत. जो माणूस गेला त्याला त्याच्या शरीराचा काहिच उपयोग नसतो. पण जर त्याच्या शरीरातील अवयवांमुळे अजुन चार लोकांचे प्राण वाचणार असतील तर ह्याच्यापेक्षा अजुन चांगली गोष्ट ती कुठली.<br /><br />पूर्व दिल्लीतील जुनेजा पती पत्नीनं ह्या महान कार्याची जणू मुहूर्तमेढ रचली. जुनेजा दांपत्याचा एकुलता एक २१ वर्षाचा मुलगा अनमोल ज्याचा रोड अपघातात दुर्दैवी मृत्यु झाला. प्रथम तर हे पचवणे किती जड आहे कि हाता तोंडाशी आलेला आपला मुलगा नियतीनं असा हिरावून घेतला. पण ह्या दुखातून बाहेर येऊन हा धाडसी निर्णय घेण नक्कीच सोपं नाहि. अनमोलचा अपघात शुक्रवारी झाला डॉक्टरांच्या पथकानी त्याचा ब्रेन डेड झाला आहे असा निर्णय दिला. अनमोलच्या काकांनी माहिती दिली कि त्यांनी दोन खाजगी रुग्णालयां बरोबर अनमोलच्या अवयवदान विषयी बोलणी केली पण दिल्लीतल्या AIMS रुग्णालयानं खरी तयारी दाखवली. सोमवारी दुपारी ३:३० वाजता त्याचा मृतदेह हॉस्पिटलमध्ये आणण्यात आला. बाकीचे सगळे सोपस्कार होऊन खरी सुरुवात रात्री १०:३० वाजता झाली. त्यांनी अनमोलचे शक्य तितके अवयव काढून घेतले ज्यात त्याच लिव्हर, डोळे, इ. अवयवांचा समावेश होता. त्यात त्याच लिव्हर एका ५८ वर्षाच्या माणसावर लगेच रोपण पण करण्यात आल जो मृत्यू शय्येवर होता. AIMS चे डॉ. मिश्रा म्हणतात कदाचित असं पहिल्यांदाच होत असेल. अनमोलच्या अवयवांचा उपयोग जवळ जवळ ३४ जणांना होऊ शकतो." त्यांनी पुढे माहिती दिली "जर ब्रेन डेड असेल तर शरीरातले ३७ अवयव परत वापरता येतात, पण जर हार्ट फेल असेल तर मात्र काहि ठरावीकच अवयव वापरता येतात."<br /><br />खरच मृत शरीराचं दहन किंवा दफन करण्यापेक्षा असं काहीतरी केल तर किती तरी जणांचे प्राण वाचतील. कित्येक लोक आपल्या मृत्युपत्रात सुद्धा लिहून ठेवतात कि त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांचं शरीर एखाद्या हॉस्पिटलला दान कराव जेणे करून त्यांच्या शवविच्छेदनाचा मानवी शरीरावर अधिक संशोधन करण्यास उपयोग होईल. अनमोलच्या माता पित्यांना अगदी मनापासून सलाम ज्यांनी आपल्या मुलाच नाव मरणोत्तर अनमोल केलं. </div>
केदारhttp://www.blogger.com/profile/14884011196968187595noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2172323680266509657.post-19746102688599735302012-10-01T18:05:00.002+05:302012-10-01T18:05:33.435+05:30पहिला मानवी बॉंम्ब<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
काल रात्री "टिव्ही" वर एक इंटरेस्टिंग कार्यक्रम पहाण्यात आला. "The Cult of the Suicide Bomber", मानवी बॉम्ब ह्या संकल्पनेचा शोध घेण्याचा प्रयत्न ह्या कार्यक्रमात घेण्यात आला होता. माझ्या माहितीप्रमाणे आपल्या भारतीयांना मानवी बॉम्ब हि संकल्पना प्रथम स्व. राजीव गांधी ह्यांच्या हत्येनंतर कळली. सार्या देशानी ह्या कृत्यावर आश्चर्य व्यक्त केले होत. "The Cult of the Suicide Bomber" ह्या कार्यक्रमात जगात जे मानवी बॉंम्ब हल्ले झाले त्याबद्दलची माहिती फार सुरेख पद्धतीने देण्यात आली होती. हा कार्यक्रम भूतपूर्व CIA Agent, .Bob Baer ह्यांनी प्रस्तुत केला होता.<br />
<br />
कार्यक्रमाची सुरूवात जगातला पहिला मानवी बॉम्ब कोण ह्या विषयाने होते. जगातला पहिला मानवी बॉम्ब हा इराणमध्ये जन्माला आला होता आणि त्याच नाव हुसेन फाहमद. तर हा हुसेन अवघा तेरा वर्षाचा असताना मानवी बॉम्ब बनून मरण पावला. म्हणजे घडले अस कि साधारण १९८० साली इराकनी आपला शेजारी राष्ट्र असलेल्या इराणवर हल्ला केला. ह्या हल्ल्याचं प्रत्युत्तर देण्याकरता जवळ जवळ प्रत्येक इराणी रस्त्यावर उतरला होता. त्यावेळचे इराणचे सर्वेसर्वा आयुतुल्हा खोमानी ह्यानी राष्ट्र आणि धर्म वाचवण्याकरता मदतीची हाक दिली, आणि त्यांच्या ह्या हाकेला इराणी धावून गेला. आपला देश आपला धर्म ह्याच्या संरक्षणाकरता घराघरातून लोक बाहेर येऊ लागले. त्यातलाच एक हुसेन फाहमद फक्त तेरा वर्षाचा कोवळा मुलगा. जेव्हा इराणच्या दक्षिणेकडे ईराक मोर्चेबांधणी करण्यात यशस्वी होत होता तेव्हा हा चिमुरडयानं आपल्या अंगावर स्फोटके लावून ईराकि टॅंकरच्याखाली स्वतःला झोकून दिले, ज्यामुळे ईराकि सेनेला मागे हटण्यापासून काहिच पर्याय ऊरला नव्हता. आणि अशाप्रकारे हुसेन फाहमद हा जगातला पहिला मानवी बॉम्ब ठरला. इराणची राजधानी असलेल्या तेहरान ह्या शहराच्या बाहेर एक मोठे कबरस्तान आहे. तिथे ह्या युद्धात शहिद झालेल्या हजारो लोकांच्या कबरी आहेत. कबरस्तानच्या मधोमध एक कबर आहे ती म्हणजे ह्या हुसेनची. आजही इराणमध्ये हुसेन हा एक महान शहिद म्हणुन ओळखला जातो.<br />
<br />
पुढे बॉब आपल्याला तेहेरानच्या बाहेर असलेल्या हुसेनच्या घरी घेऊन जातो. बॉब आपल्याला हे सांगायला विसरत नाहि कि तो ह्या घराला भेट देणारा पहिला पाश्चिमात्य आहे. तो हुसेनच्या आई वडलांना भेटतो त्यांच्याशी बोलतो. हुसेनच्या आई आणि वडलांना त्याच्या मुलाचा खूप अभिमान वाटतो. त्याची आई सांगते तो एक दिवस शाळेतुन घरी आला आणि आईला युद्धावर जायची परवानगी मागायला लागला. त्याच्या आईनपण त्याला होकार दिला. तिच्या म्हणण्याप्रमाणे हा मार्ग त्याला "खुदा" नी दाखवला होता तेव्हा ती त्याला अडवणारी कोण? हुसेनचे वडिल मोठ्या अभिमानानं सांगतात कि इराणमध्ये शाळेत मुलांना हुसेनच्या हौतात्म्याची कहाणी शिकायला आहे.<br />
<br />
असा हा जगातला पहिला मानवी बॉम्ब हुसेन फाहमद, आपल्या राष्ट्रभूमीच्या संरक्षणाकरता शहिद झाला. पण मानवी बॉम्ब बद्दल आजच सत्य हे फारच विदारक आहे. १९८० साली हुसेनन दाखवलेला हा मार्ग पुढे दहशतवाद्यांच प्रमुख अस्त्र बनेल अस तेव्हा कोणाला वाटलंही नसेन. हे पाहुन मनात विचार आला, इराणकरता असलेल हुसेनच हे बलिदान सार्या जगाला शाप तर ठरलं नाहि ना...</div>
केदारhttp://www.blogger.com/profile/14884011196968187595noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2172323680266509657.post-49958124045265189932012-09-28T14:03:00.001+05:302012-09-28T14:03:06.347+05:30वाचाल तर वाचाल<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
सध्या अगदी नित्य नेमाने पेपर(वर्तमान पत्र) वाचतोय. म्हणजे अगदी मराठि आणि इंग्रजी असे दोन्ही वृत्तपत्र वाचण्याचा प्रयत्न करतोय, आणि मनापासून सांगतोय कि गेल्या काहि दिवसांपासून मला माझ्यातला झालेला फरक अगदी प्रकर्षानं जाणवतोय, आपल्या आजूबाजूला काय चाललय हे आता माहिती व्हायला लागलय. पण सगळ्यात जास्त आश्चर्य वाटतय ते ऑफिसमधल्या माझ्या मित्रांना, कारण एरवी लंच टेबलवरच्या डिस्कशन मध्ये शांत बसणारा मी सध्या चक्क माझी मतं मांडतोय. <br /><br />आधीपण नियमितपणे वृत्तपत्र वाचले जायचे पण ऊडत ऊडतच. हेडलाईन, सिनेमाच्या जाहिराती आणि राशी भविष्य बस झाला पेपर वाचुन. पण मग हळुहळु स्वतःला वृत्तपत्र डिटेल्डमध्ये वाचण्याची सवय करून घ्यायला लावली आणि माझा त्यातला इंटरेस्ट वाढत गेला. आहो एका दिवसात ह्या जगात किती अफाट घटना घडतात अगदी आश्चर्य वाटलं. म्हणजे मी इतके दिवस ह्या सगळ्यापासून किती अनभिद्न होतो. <br /><br />एकीकडे आपणच पोसणारे काहि राजकारणी आपल्याच पैशाचा किती गैरवापर करतात. तर दुसरीकडे काहि राजकारणी ह्या सगळ्याला वाचा फोडण्याकरता स्वतःच्या जीवाचा आटापिटा करत असतात. आहो हे फक्त आपल्याच देशापुरत मर्यादित नसून अगदी पुढारलेल्या पाश्चिमात्य देशांत पण हेच चालतं. किती विसंगतींनी भरलेल आहे हे जग. एकीकडे अतिरेकि लोकांना मारण्याकरता नविन नविन अतिरेकि मार्ग शोधत असतात तर दुसरीकडे रेड क्रॉस सारख्या संस्था गांजलेल्या लोकांच्या जखमा भरायचा प्रयत्न करत असतात. कुठे नवनवीन शोध लागत असतात तर कुठे जुन्या अंधश्रध्दांपायी लोक अगदी खालच्या थराला जाऊन पोहोचतात. कुठे पाण्यावाचून दुष्काळ तर कुठे पाण्याविना दुष्काळ. अहो एक ना अनेक अशा विविध बातम्या ह्या पेपरमध्ये सामावलेल्या असतात. आणि तेव्हा एक मात्र पटल वाचाल तर वाचाल.</div>
केदारhttp://www.blogger.com/profile/14884011196968187595noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2172323680266509657.post-37808627934027813002012-09-10T16:26:00.002+05:302012-09-10T16:37:11.442+05:30रमा मोठि झाली हो !!!<br />काल आपली यमु म्हणजे रमाबाई मोठ्या झाल्या आणि त्याहि चांगल्या चार पाच वर्षांनी. खूप दिवसांपासून ज्याची वाट पहात होतो ते एकदाच झाल आणि मालिका थोडि पुढे सरकली. म्हणजे आता <a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgolpcErfjleuf3mgl-P_cOLu-D-hSGxAFKo4amwYLxBWHwwHWhYsE2xwdwECJKaNDMX1OSuXXdFQmyEx5qUUvOXZFF_XEfe69vi4es1H3nVdpEHPr9j5U_-200JJudk6Qt-xr86XF2oIQ/s1600/images.jpg"><img style="float: right; margin: 0px 0px 10px 10px; cursor: pointer;" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgolpcErfjleuf3mgl-P_cOLu-D-hSGxAFKo4amwYLxBWHwwHWhYsE2xwdwECJKaNDMX1OSuXXdFQmyEx5qUUvOXZFF_XEfe69vi4es1H3nVdpEHPr9j5U_-200JJudk6Qt-xr86XF2oIQ/s320/images.jpg" alt="" id="BLOGGER_PHOTO_ID_5786502335796654882" border="0" height="104" width="199" /></a><span>तरी</span> काहीतरी नवीन पहायला मिळेल याचा आनंद झाला. मालिका तशी अगदीच कुर्म गतीनं पुढे सरकतेय. बरीच पात्र (का<span>ल्प</span><span>निक</span> कि खरी) असल्यामुळे असेन कदाचित पण मध्यवर्ती भूमिकेतील रमाबाई आणि त्यांच आयुष्य कुठेतरी दुय्यम <span>झाल्यासारखं</span> वाटत होतं. मध्यंतरी काहि दिवस मी हि मालिका बघणंही सोडून दिलं होत कारण एकच, हि मालिकाही त्या टिपिकल सासू आणि सुन ह्या वळणावर जायला लागली होती. पण परवा आता रमाबाई मोठि होणार हि जाहिरात पाहिली आणि परत काल उत्साहानं बघायला बसलो.<br /><br />बाल रमाबाईची भूमिका करणार्या तेजश्रीच कराव तेवढं कौतुक थोडच. तिनं त्या भूमिकेचं सोनं केल. शेवटि शेवटि तर असं वाटायला लागल होत कि निर्मात्यांना पण रमाबाईला मोठे करण्यामध्ये बहुतेक तूर्तास तरी रस नसावा. बाल रमेच ते लाडिक स्वरातल बोलण "माझी आई म्हणते" कायम लक्षात राहिल हे नक्की.<br /><br />कालचा भाग विशेष एक तासाचा होता. कालच्या भागातील बहुतेक सगळ्या पहिल्या घटना अगदी टिपीकल वाटल्या. भागाच्या शेवटि रमा मोठि झाली. खूप उत्सुकता ताणली आणि जेव्हा मोठि रमा समोर आली तेव्हा तोंडातून एकदम बाहेर आलं अरे हि तर आपली "कुहु (एका लग्नाची दुसरी गोष्ट मधली)". काल कुहु म्हणजे स्पृहा जोशी रमाबाईच्या गेट अप मध्ये खूपच छान दिसत होती. कालच्या भागात तिला फार अस करण्यासारखे काहिच नव्हत. जाता जाता एक मान्य कराव लागेल छोट्या तेजश्रीनं स्पृहा पुढे मोठे आव्हान ठेवल आहे आणि येणार्या पुढच्या काहि भागांमधून अंदाज येईलच कि स्पृहा हि भूमिका कशी पेलेल ते. तोपर्यंत मालिका बघत रहायला काहिच हरकत नाहि.<br /><br />स्पृहाच ह्या नव्या भूमिकेबद्दल अभिनंदन आणि ALL THE BEST !!!<br />केदारhttp://www.blogger.com/profile/14884011196968187595noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2172323680266509657.post-18565603610288800172012-04-20T15:30:00.000+05:302012-04-20T15:30:21.322+05:30टिकटं प्लीज<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
काल सकाळी नेहमीप्रमाणे सी एस टी ला जाणारी स्लो लोकल पकडली. बसायला छान विंडो सीट मिळाली, आ..हा..हा... काय नशीब. चला आता दादर पर्यंत चिंता नाहि. लोकल सुरू झाली आणि डोळे मिटुन घेतले ते एकदम सायनलाच उघडले. मग जरा स्थिरस्थावर होत दादरला उतरायची तयारी सुरू केली. लोकल दादर स्टेशनवर थांबली आणि मी त्या उतरणार्या लोकांच्या घोळक्यातून दरवाजाच्या दिशेने सरकत बाहेर आलो. बाहेर खूप गर्दी होती, पण त्या गर्दीत सुद्धा कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला म्हणून मागे वळून पाहिल तर तो टी सी होता. मी थोड <span class=" transl_class" id="0" title="Click to correct">त्रासीक</span> नजरेने त्याच्याकडे पाहिल कारण आजपर्यंत मी टी सी ह्या प्रकाराचा सामना फारच कमी केला आहे, त्यामुळे असेल कदाचित.<br />
"सर! टिकिट प्लीज"<br />
मग मी अजूनच <span class=" transl_class" id="3" title="Click to correct">त्रासीक</span> चेहरा करत <span class=" transl_class" id="1" title="Click to correct">खिशात</span> <span class=" transl_class" id="2" title="Click to correct">हात</span> घातला, पाकीट काढलं आणि त्याच्यासमोर पास धरला. पण तेवढ्या वेळात तो एका दुसर्या व्यक्तीशी बोलण्यात व्यस्त होता.<br />
"अरे मेरा जल्दी करो यार, ऑफिस <span class=" transl_class" id="4" title="Click to correct">जाने</span> के लिये लेट हो रहा है"<br />
मग <span class=" transl_class" id="5" title="Click to correct">त्यान</span> माझ्या पास मध्ये लक्ष घातल.<br />
"सर, ये तो दो दिन <span class=" transl_class" id="6" title="Click to correct">पहलेहि</span> खतम हुआ है"<br />
मी एक्दम चमकलो, अरे देवा पास संपला का, मी पास वरची तारीख पाहिली आणि तो खरच संपला होता. माझं सगळं अवसान गळून गेलं.<br />
"अरे बापरे! अब क्या करनेका?"<br />
"<span class=" transl_class" id="7" title="Click to correct">आपको</span> फाइन भरना पडेगा. फर्स्ट क्लास का है इसलिये ३७५ रू होगा"<br />
तो पावती पुस्तक खिशातून काढत म्हणाला. मग मी माझ्या पाकिटात पाहिल तर फक्त दिडशे रुपये होते.<br />
"पर अभी मेरे पास इतना पैसा नहि है"<br />
"ठिक है जरा साईड मे चलो"<br />
मग तो मला मोठ्या विजयी मुद्रेने त्यांच्या ऑफिसमध्ये घेऊन गेला आणि मला खुर्चीवर बसवत म्हणाला.<br />
"देखो सर <span class=" transl_class" id="8" title="Click to correct">कायदे</span> से तो ३७५ होते है."<br />
"लेकिन मेरे पास तो इतने है नहि. जरा देखोना कुछ होता है तो."<br />
मी शक्य तितक्या आर्जवी स्वरात त्याला म्हटलं. मग तो थोडे आढेवेढे देत म्हणाला.<br />
"ठिक है सर आप कितना दे सकते हो"<br />
"देखो <span class=" transl_class" id="9" title="Click to correct">मेरे</span> पास अभी सिर्फ देडसो है उसमे से मै १०० दे सकता हु."<br />
"अरे सर १०० से क्या होगा कमसेकम २५० देना पडेगा"<br />
"अरे यार ये देखो मेरा वॉलेट मेरे पास इतने रुपये है हि नहि. चाहिये तो एक काम करो किसीको मेरे साथ भेजदो मै ए टि एम से निकालकर देता हु."<br />
तो थोडा विचारात पडला.<br />
"ठिक है सर १०० दे दो आप जैसे शरीफ आदमी के साथ सख्ती करना अच्छा नहि लगता.<br />
मी पटकन त्याच्या हातावर १०० ची नोट ठेवली.<br />
"अभी आगे जानेसे पहले पास निकालकर जाओ."<br />
"जरूर, धन्यवाद"<br />
<br />
मग मी तिकडनं बाहेर निघालो आणि वर ब्रीज चढायला लागलो. पण मन मात्र सतत खात होत. एकीकडे आपण म्हणतो ह्या देशात खूप भ्रष्टाचार झालाय आणि दुसरीकडे आपणच आपल्या कृतीतून भ्रष्टाचाराला पाठिंबा देतो. मी ३७५ रू वाचवण्याकरता १०० रू ची कोणाला तरी लाच दिली. माझा प्रश्न सुटला <span class=" transl_class" id="10" title="Click to correct">होता</span> मात्र भ्रष्टाचाराच्या <span class=" transl_class" id="11" title="Click to correct">रोपाला</span> मी कळत नकळत आज कुठेतरी खतपाणी <span class=" transl_class" id="12" title="Click to correct">घातल</span> होत. प्रत्येकजण जर असच करायला लागला तर भ्रष्टाचार हा क्धीच संपणार नाहि. त्याकरता कितीही अण्णा हजारे आले तरी <span class=" transl_class" id="13" title="Click to correct">काहिच</span> फरक पडणार नाहि. आणि मग मनाशी निश्चय पक्का केला. ए टि एम <span class=" transl_class" id="14" title="Click to correct">मधुन</span> पासाचे रू + २७५ काढले. मग प्रथम पास काढला आणि खाली उतरून परत त्या टि सी च्या ऑफिसमध्ये गेलो. तो टि सी तिथेच बसला होता. त्याच लक्ष माझ्याकडे गेलं आणि तो आश्चर्यानं म्हणाला.<br />
"अरे आप?"<br />
"ये लो बाकिका २७५ रू."<br />
"अरे इसकि क्या जरूरत थी? ये सब तो चलता हि रहता है"<br />
"नहि मैने कानून तोडा है तो मुझे फाइन भरनाहि पडेगा. प्लीज मुझे इसकि रसीद दे दिजीये"<br />
मग त्यान माझ्याकडे पाहिल आणि मला मी भरलेल्या दंडाची पावती दिली. मी जेव्हा त्याच्या ऑफिसमधून बाहेर आलो तेव्हा मनात एकच विचार होता.<br />
"आज मी भ्रष्टाचाराला विरोध केला."</div>केदारhttp://www.blogger.com/profile/14884011196968187595noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2172323680266509657.post-54913912788217870782011-10-17T15:59:00.005+05:302011-10-17T16:27:39.325+05:30दहीमी दही आणि ताक ह्यांचा डायहार्ड फॅन आहे, म्हणजे रोज दही पाहिजेच असं पूर्वी होत पण हल्ली सर्दि आणि कफ ह्यामुळे ते प्रमाण थोडं कमी झालं आहे, पण तरीही जेव्हा लहर येते किंवा लक्षात येत तेव्हा आवर्जून दही किंवा ताक पितो. दही हे करायला अगदी सोपं असतं म्हणून मी हि तयार करतो अधुन म<a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiRSLN6cQlKmHLjA8eT0W7uY6yepMMWeKqJIkmCFPm9JTIH-Cdijlah-CrPBHEbaAB7ztcONyTEo7W-HjJ_oXUpEv1w59zxs4bgZzi4wEzuC5b56QUQRYDCQzS5uMz9tDYygqh5rxm4yEQ/s1600/yogurt1211010.jpg"><img style="float:right; margin:0 0 10px 10px;cursor:pointer; cursor:hand;width: 320px; height: 241px;" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiRSLN6cQlKmHLjA8eT0W7uY6yepMMWeKqJIkmCFPm9JTIH-Cdijlah-CrPBHEbaAB7ztcONyTEo7W-HjJ_oXUpEv1w59zxs4bgZzi4wEzuC5b56QUQRYDCQzS5uMz9tDYygqh5rxm4yEQ/s320/yogurt1211010.jpg" alt="" id="BLOGGER_PHOTO_ID_5664412625639135650" border="0" /></a>धुन. तर असच आज मी दही विरजायला लावत होतो आणि डोक्यात एक विचार आला. आपण दही विरजायला लावतो ते कस तर प्रथम थोडं आधीच दही घेतो ज्याला विरज<span><span><span>ण</span></span></span> असं म्हणतात. मग त्यात पाहिजे तेवढं दूध टाकायचं शक्यतो कोमट, मग चमच्यानं भरपूर ढवळायचं आणि हे मिश्रण तसंच ठेवून द्यायचं झालं थोड्याच वेळात दही तयार. आता तुम्ही म्हणाल यात काय विचार करण्यासारखं आहे तर जेव्हा मला दही करायच होत तेव्हा माझ्याकडे आधीच दही होत म्हणून मी ते विरजायला लावू शकलो पण ज्यांनी ह्या दह्याचा शोध लावला असेल त्यान ते सगळ्यात पहिल्यांदा कस तयार केलं असेल? झालं डोक्यात भुंगा शिरला आणि मायाजालात अधिक माहिती शोधायला सुरूवात केली आणि जी काहि माहिती <span><span><span>मिळाली</span></span></span> ती अशी.<br /><br />साधारण ई.स. पूर्व २००० बीसीई पासून दही अस्तित्वात असल्याच्या नोंदि आहेत पण दही असं कोणी पहिल्यांदा तयार केलं नव्हत तर त्याकाळी बकरीच्या कातडीपासून तयार केलेल्या पिशव्या दूध ने आण करण्याकरता वापरत असत आणि ह्या कातडी वर दही तयार करणारे जीवाणु असतील आणि त्यामुळेच त्या पिशवितच त्याच दही झालं असेल असं मानल जात. हि झाली दही तयार होण्याची मूळ कहाणी पण प्रत्येक देशात अगदी आवडीनं खाल्ला जाणारा हा पदार्थ स्वतःबद्दल वेगवेगळ्या आख्याईका बाळगून आहे. पुराण काळात भारत आणि इराण ह्या देशांच्या संस्कृतीत दह्याचा उल्लेख अ<span><span><span>गदी</span></span></span> प्रकर्षानं आढळतो, म्हणजे जर तुम्ही नीट विचार केलात तर देवाच्या पुजेत जे तिर्थ दिलं जात ते बर्याच वेळेला दह्याच असतं, पुराणात दही आणि मध ह्यांच मिश्रण हे देवांच अन्न म्हणून मानल गेलं आहे.<br /><br />अगदी १९ व्या शतकापर्यंत आशिया खंडातील बहुतेक देशात दही हे रोजच्या जेवणाचा एक अविभाज्य भाग होत. साधारण १९०५ साली बल्गेरियाच्<a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEifyeqneywxRjhQb0kx0UpLjgHoOH4FlqD6ERu5KiJpgqimnROD2rSt9wAOtGdBN0j856z9lIEpdZAeVyWECwunydtZBW5nJtG_7VHvCq6K8SoKdc1wAsw7k9elMIr6y0CkDPbtUgLeuNY/s1600/yogurt.jpg"><img style="float:left; margin:0 10px 10px 0;cursor:pointer; cursor:hand;width: 320px; height: 241px;" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEifyeqneywxRjhQb0kx0UpLjgHoOH4FlqD6ERu5KiJpgqimnROD2rSt9wAOtGdBN0j856z9lIEpdZAeVyWECwunydtZBW5nJtG_7VHvCq6K8SoKdc1wAsw7k9elMIr6y0CkDPbtUgLeuNY/s320/yogurt.jpg" alt="" id="BLOGGER_PHOTO_ID_5664413210614841282" border="0" /></a><span><span><span>या</span></span></span> काहि विद्यार्थ्यांनी दह्यावर प्रथम संशोधन केल. त्यांनी बल्गेरियन दह्यावर संशोधन केल आणि <span><span><span>त्यात</span></span></span> त्यांना लंबगोलाकार आकाराच्या आम्लतत्ववादि जीवाणू आढळले ज्यांना त्यांनी लॅक्टोबॅसिलस असं नाव दिलं. प्रसिद्ध रशियन <span>जीव शास्त्रज्ञ</span> लीया लीय्च मेक्नीकोव्ह ह्याच्या मते बेल्जियम <span>शेतकर्यांच्या</span> रोजच्या जेवणातील दह्याच्या वापरामुळे त्यांच्या आयुरामानात कमालीची वाढ दिसून आली, अर्थात हा झाला त्याच्या संशोधनाचा भाग पण ह्यातल्या सत्यतेचे अधिक पुरावे काहि सापडत नाहित. एक आश्चर्याची गोष्ट आशी कि ह्या दह्याच आगमन अमेरिकेत विसाव्या शतकाच्या सुरूवातीलाच झालं, तोपर्यंत हे दही आशिया खंडातच जास्त खाल्ले जायचे.<br /><br /><span>दही हे आरोग्याला उत्तम असतं</span> त्यात प्रोटिन, कॅल्शियम, आणि विटामिन बी चा भरपूर साठा सापडतो. कॅल्शियमच्याही अस्तित्वामुळे हे वजन कमी करण्याचा पण एक उत्तम उपाय म्हणून ज्ञात आहे. दही हे अतिसारासारख्या विकारांवर प्रतिजैविक म्हणून पण वापरात आणतात. आपली पूर्वीची लोक म्हणतात दही हे पित्तनाशक असतं पण ते जेव्हा ते खूप घुसळून त्याच ताक करतात तेव्हा ते शरीराला थंडावा देणार एक उत्तम पित्तनाशक बनत. म्हणूनच कदाचित हिंदू संस्कृतीत जेवण झाल्यावर ताक प्यायची पद्धत असावी. दुधाच्या सायीपासून तयार केलेलं दही जेव्हा घुसळलं जात तेव्हा त्यातून लोणी निघत आणि पुढे ह्याच लोण्यातून कढवुन तुप केलं जात. आपल्या देशात दही वेगवेगळ्या पद्धतिने खाल्ले जात. लस्सी हा प्रकार उत्तर भारतात जास्त प्रसिद्ध आहे, साखर आणि सुकामेवा घालून केलेलं घट्ट ताक म्हणजे लस्सी. दक्षिण भारतात दह्यापासून केलीली कढि हि रोजच्या जेवणाचाच भाग असते. भात आणि त्यावर कढि म्हणजे त्यांच्या तोंडाला पाणी <span>सुटल्या शिवाय</span> रहात नाहि. दही पुष्कळ प्रकारच्या शाकाहारी आणि मांसाहारी <span>पदार्थात पण</span> वापरल जात. असं हे बहुपयोगी दही ज्याची जितकी माहिती सांगावी तेवढी थोडीच.केदारhttp://www.blogger.com/profile/14884011196968187595noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-2172323680266509657.post-32061813700523194622011-03-14T16:15:00.003+05:302011-03-14T17:01:46.918+05:30शेगांव ते अकोलापरवा शेगांव वरून अकोल्याला जायचा योग आला आणि तोही आपल्या लाल डब्यातून म्हणजे एस टि हो. झालं असं कि सक्काळी अगदी लवकर शेगावला माऊलीच अगदी सुखात (रांगेत तिष्ठत उभं न राहता) दर्शन झालं आणि सुखावलो. खूप छान वाटल, मग मस्तपैकी नाश्त्यावर ताव मारला. सक्काळी खूपच लवकर उठल्यामुळे थोडावेळ भक्तनिवासमधील खोलीत थोडावेळ आराम केला. साधारण दुपारी बारा साडेबाराला आनंदसागरला जायला निघालो. हल्ली शेगावला आलं आणि आनंदसागरला भेट दिली नाहि कि पूर्णत्वचं वाटत नाही. आनंदसागरच ते रम्य विलोभनीय वातावरण डोळ्यात साठवलं कि कसं छान वाटत. एकदा इथं आलं कि संपूर्ण दिवस कसा जातो ते कळतच नाही. हल्ली इथे तिकीट काढायला लागत, पूर्वी मात्र जर तुमच्याकडे अभिषेकच्या पावत्या असतील तरीसुद्धा तुम्ही आत प्रवेश करू शकत होता. दुपारी जेवणाच्या वेळेतच पोहोचलो असल्यानं दुपारचं जेवण इथेच उरकलं. मग थोडावेळ विश्रामवाटिकेत विश्राम करावा म्हणून तिथं निघालो तर समोरच संपूर्ण आनंदसागर फिरवून आणणारी तॊ छोटीशी रेल्वेगाडी दिसली मग काय आम्ही सगळे त्या गाडीत शिरलो. गाडीतून आनंदसागरला एक फेरी मारून झाल्यावर थोडावेळ विश्रामवाटिकेत आराम केला. साधारण चार वाजता उन्ह उतरायला लागल्यावर आम्ही बच्चे कंपनी बरोबर बागेत विविध खेळ खेळायला गेलो. मग दमून भागून येऊन संध्याकाळच्या अल्पोपहाराचा फडशा पाडला. आनंदसागर हि इतकी सुंदर आणि विलोभनीय जागा आहे कि इथे वेळ कसा जातो ते कळतच नाहि. इथे सगळ छान आहे पण एक गोष्ट मात्र मला नेहमीच खटकते, इकडचे सगळे सूचना फलक हिंदीतून आहेत. मला मान्य आहे कि हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे पण राष्ट्र भाषेबरोबर मात्रुभाषेला पण अग्र स्थान दिले तर ह्या जागेची शोभा नक्कोच अजुन वाढेल. असो, मग अल्पोपहारानांतर मात्सालय पहायला गेलो. विविध रंगाताले, दंगाताले, निरनिराळ्या आकारातले ते मासे अगदी आकर्षक वाटत होते. मत्सालायातून बाहेर येईस्तोवर चांगलाच अंधार पडला होता, त्यामुळे आता शेवटच ठिकाण बघायचे म्हणून लाईट आणि मूझीक शोला भेट दिली. ह्या कार्यक्रमाची मजा काही औरच असते, संगीताच्या तालावर आणि रंगीत प्रकाश झोतात कारंजाताले तुषार जणू नर्तनच करत असल्याच भासतं, अगदी मंत्रमुग्ध करणारा हा अनुभव असतो. थोडावेळ हा नयनरम्य कार्यक्रम पाहून मग परत भक्तानिवासच्या दिशेने निघालो.<br /><br />ह्यावेळेस शेगावावारून परत मुंबईला यायच्या ऐवजी अकोल्याला एका नातेवाईकांकडे जाण्याचा बेत होता त्यामुळे सगळ सामान आवरून साधारण सव्वा आठ वाजता भक्त निवास सोडल आणि शेगाव स्टेशन गाठल ते मिळेल ती गाडी पकडून अकोल्याला जायला, बरोबर बायको आणि मुलगी पण होते. मुंबईची सवय असणाऱ्या आम्हाला हा प्रवास आणि हे ठिकाण अगदीच अनोळखी होत. स्टेशनवर आल्यावर कळल की अकोल्याला जाणारी पुढची गाडी रात्री दहा वाजता आहे, मग तिथेच तिकीट खिडकीवर चौकशी केली तेव्हा कळल की साधारण नऊच्या सुमारास जवळच असलेल्या एस टि स्टॅन्ड वरून अकोल्याला बस सुटते जी दहा वाजेपर्यंत अकोल्याला पोहोचते. दहा पर्यंत शेगावामध्ये गाडीची वाट बघत बसण्यापेक्षा सरळ बसनीच जाऊ म्हणजे गाडीपेक्षा लवकर पोहोचू सुद्धा असा विचार करत एस टि स्टॅन्डला गेलो. इथे आल्यावर जाणवलं की सगळ जग बदललंय पण आपले एस टि स्टॅन्ड अजूनही तसेच जुनाट आहेत. समोरच चौकशी केंद्र दिसलं, तिथे अकोल्याला जाणाऱ्या बसची चौकशी केली तेव्हा नेहमीप्रमाणे उडवाउडवीच उत्तर न मिळता चक्क व्यवस्थितपणे उत्तर मिळाल <span>की</span> नऊ वाजता समोरून बस सुटेल. नंतर त्या माणसाच्या चेहऱ्यावरचे ते त्रासिक भाव बघून माझी ह्याच्यापेक्षा जास्त प्रश्न विचारायची हिंमतच झाली नाहि. मग आम्ही तसंच तिथे वाट पहात बसलो, तेवढ्यात समोरून एक बस येताना दिसली तशी सौ म्हणाली बघ कदाचित हिच बस असेल म्हणून. मग मी त्या बसच्या दिशेने धावत सुटलो, आतली लोक अजूनही उतरतच होती आणि बाहेरची माणसं आत शिरण्याकरता धक्का बुक्की करत होते. त्या गर्दीतच एक दोन जणांना विचारल <span>की</span> हि बस कुठे जाणार पण कोणीच धड उत्तर दिल नाहि. मग समोरच एक खाकी गणवेशातला माणूस दिसला बहुतेक तो ड्रायव्हर होता, त्याला विचारल तर त्यान हि बस अकोल्याचीच असल्याच सांगीतल. मग आम्ही पण बसमध्ये चढण्याकरता त्या रेटारेटीत घुसलो. खांद्यावर सॅक, कडेवर मुलगी आणि सोबत चढणा<span>ऱ्या</span><span>ची</span> ती प्रचंड रेटारेटी असे सगळ सांभाळत मी कसातरी बसच्या आत चढायला लागलो. तेवढ्यात मला जाणवलं <span>की</span> कोणीतरी माझ्या जीन्सच्या पाकीट असलेल्या खिशात हात घालत आहे, मग मी हिंदी आणि मराठी मिळेल त्या भाषेत आरडाओरडा करायला सुरूवात केली तसा एक वेगळाच गोंधळ उडाला, तेवढ्यात त्याने हात पटकन काढून घेतला. ह्या सगळ्या गोंधळात मला मात्र पटकन आत चढायला मिलाल, आतमध्ये पहिली सगळी आसन आधीच भरली होती मग साधारण शेवटून तिसऱ्या रांगेत जागा मिळाली तेही तिघाजणांची सीट आडवुन ठेवणाऱ्या मुलाला विनंती केल्यावर,<br /><br />थोड्याच वेळात बस पूर्णपणे भरून गेली. आमच्या मागच्या जागेमध्ये प्रचंड गोंधळ सूरू होता कारण काही टारगट मुलांचा घोळका येऊन तिथे बसला होता. त्यांचा जोरजोरात आरडाओरड चालू होता, त्यातल्याच दोन जणांनी मोबाईलवर मोठ्या आवाजात कुठलीतरी टुकार हिंदी गाणी लावली होती. बस काही हलायला तयार नव्हती, खूपच गरम व्हायला लागलं होत. अशातच माझ्या मनात परत एकदा शंकेची पाल चुकचुकली जर हि बस अकोल्याची नसेल तर? कारण बसच्या पुढे तस काहीच लिहील नव्हत. तशातच बाजूलाच धक्के खात असलेल्या एका साधारण खेडवळ दिसणाऱ्या व्यक्तिने मला आत सरकायला सांगीतल, थोडे आढेवेढे घेत मी आत सरकलो तसा तो माझ्या बाजूला बसला. त्यानेच विचारल कुठे चाललात म्हणून मग मी त्याला अकोल्याला असं सांगीतल, तर तो म्हणाल हि बस अकोल्याला नाहि तर बाळापूरला जाते, हे ऐकून माझ्या पोटात गोळाच आला. मी लगेच सौला हे सांगीतल तसं ती म्हणाली <span>की</span> तिनं आमच्या पुढच्या सीटवर बसलेल्या आणि जरा सुस्वरूप दिसणाऱ्या मुलींना आधीच विचारल होत. त्यांनी तिला हि बस अकोल्यालाच जाणार असल्याच सांगीतल होत आणि त्याही अकोल्याच्याच होत्या. पण माझं किहि समाधान होईना, एक तर रात्रीची वेळ आणि हे असं अनोळखी ठिकाण, मी परत तिच्या डोक्याशी भूणभूण सुरु केली <span>की</span> तू त्या मुलींना परत विचार <span>की</span> त्या पण अकोल्यालाच उतरणार आहेत म्हणून. मग तिन तस विचारल तेव्हा त्यांनी तिला हो सांगीतल तसं तो माझ्या बाजूचा माणूस त्यांना पण ही बस फक्त बाळापूर पर्यंत जाणार असल्याच म्हणाला, आता त्या मुली पण चक्रावून गेल्या होत्या. एव्हाना बसमध्ये ड्रायव्हर पण येऊन बसला होता, पण कंडक्टर काहि दिसत नव्हता. मग त्यातल्याच एका मुलीन खिडकीतून खाली उभ्या असलेल्या त्यांच्याच ओळखीच्या एका मुलाला ड्रायव्हरला जाऊन विचारायला सांगीतल. तो मुलगा धावत गेला आणि ड्रायव्हरला विचारुन आला आणि त्यान ती बस अकोल्याचीच असल्याला दुजोरा दिला तेव्हा कुठे जीव भांड्यात पडला. एव्हाना बसमधल्या त्या टारगट मुलांचा गोंधळ आजुनच वाढला होता. शेवटी एकदाची बस सुरू झाली आणि थोड़ी हवेची झुळूक आली तसं एकदम ब़र वाटल. पण आजुनही कंडक्टर काही दिसत नव्हता, थोड्याच वेळात माझ्या लक्षात आलं की त्या बसचा कंडक्टर एक स्त्री होती आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. ती त्या गर्दीतून वाट काढत काढत स्वताच काम अगदी चोख बजावत होती. मी लगेच सौच लक्ष तिथे वेधलं, आमच्या दोघांच्याही चेहऱ्यावर आश्चर्य आणि कौतुक असे दोन्ही भाव उमटले होते. खरच किती धैर्य वाटत होत तिच्यात, एवढ्या गर्दीत आणि तेही एवढ्या रात्रीच्या वेळी ती सराईतपणे आपलं काम करत होती तेही अशा ग्रामीण भागात. हळूहळू ती गर्दीतून वाट काढत आणि तिकिट देण्याच काम करत त्या टारगट मुलांच्या घोळक्यात शिरली, तशा सगळ्यांच्याच नजरा तिथे लागल्या की ही आता कसं काय निभावून नेणार ते. पण ती अगदी निर्विकारपणे तिचं काम करत होती, तिचं लक्ष त्या मुलांकडे अजिबात नव्हत. थोड्याच वेळात ती अगदी शेवटच्या आसनापर्यंत सगळ्यांना तिकिट देऊन पुन्हा गर्दीतून वाट काढत पुढे निघून गेली पण.<br /><br />आता बसन पण चांगलाच वेग घेतला होता, बाहेरचा रस्ता अगदी खराब होता त्यामुळे बसमध्ये अशक्य खड्खड असा आवाज येत होता. खिडक्यांची काचेची तावदान जोरजोरात वाजत होती. मला तर वाटल की हे असं आजून थोडावेळ जरी चालू राहील तरी ही तावदान खाली पडतील. विचारांच्या नादात अकोला कसं आलं कळलच नाही. आम्ही बसमधून बाहेर पडलो, ते ह्या प्रवासातल्या संमिश्र आठवणी घेऊनच.केदारhttp://www.blogger.com/profile/14884011196968187595noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-2172323680266509657.post-88612976700529180402010-12-10T17:02:00.007+05:302010-12-10T17:36:12.909+05:30सांकेतिक भाषाकाल सकाळी ऑफिसला जायला जरा आरामातच निघालो, आदल्या दिवशी घरी यायला खूप उशीर झाला होता त्याची कसर भरुन काढत होतो. सकाळी साधारण साडेअकरा ची लोकल पकडली, ह्यावेळी अजुन तरी फर्स्टक्लास<span>च्या</span> डब्यात कमी गर्दि असते. ऑफिसची बॅग वरती स्टॅन्डवर ठेवून जागेवर बसलो. हल्ली थंडिपण थोडीफार जाणवायला लागली असल्याने साडेअकरा वाजता सुद्धा छान प्रसन्न वाटत होत. मग जरा स्थिरस्थावर झाल्यावर आजूबाजूला नजर फिरवली. डब्यात खूपच कमी लोक होती, आणि जे होते ते आपापल्या उ<a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhDqJgW6m23bFk23l344JV9kSpNjwyReGNhnT17B5UdTKjNuy2Oa6eLx9-0waqenNcGokjawQ95u2VNz428fZR3W6S1qQkheYDu4rG48s746tFqKYX9FFJN8IT1gHPGkAPscqlBJe744VE/s1600/body_language.jpg"><img style="float: right; margin: 0pt 0pt 10px 10px; cursor: pointer; width: 200px; height: 199px;" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhDqJgW6m23bFk23l344JV9kSpNjwyReGNhnT17B5UdTKjNuy2Oa6eLx9-0waqenNcGokjawQ95u2VNz428fZR3W6S1qQkheYDu4rG48s746tFqKYX9FFJN8IT1gHPGkAPscqlBJe744VE/s200/body_language.jpg" alt="" id="BLOGGER_PHOTO_ID_5549023249533109698" border="0" /></a><span><span>द्योगात</span></span> गुंग होते. सहजच माझं लक्ष समोरच्या सीटवर गेलं तिथे कॉलेजला जाणारी तीन मुलं बसली होती, तिघांनीही आपली डोकी कुठल्यातरी इंजिनिअरींगच्या पुस्तकात घातली होती, बहुतेक परीक्षेचा अभ्यास करत असतील असा विचार करुन मी परत खिडकीतून बाहेर बघु लागलो.<br /><br />थोड्यावेळानं माझं लक्ष पुन्हा त्या मुलांकडे गेलं आणि मी स्तब्धपणे त्यांच्याकडे बघतच राहिलो, अ<span><span>हो</span></span> ती हातवारे करत एकमेकांशी संवाद साधत होती म्हणजे ते तिघेही मुके किंवा बहिरे होते. मी आश्चर्यानं त्यांच्याकडे बघतच बसलो कारण दैवान त्यांच्याशी असा क्रूर खेळ खेळला असला तरीही त्यांनी त्याच्यावर मात करत <span>इंजिनिअरींग पर्यंत ची</span> मजल मारली होती. मला त्या तिघांचे खरच अगदी मनापासून कौतुक वाटलं. थोडावेळ तसाच त्यांच्यातला तो संवाद समजण्याचा प्रयत्न करत बसलो. पूर्वी दूरद<span><span>र्शनवर</span></span> दर रविवारी दुपारी मुक्या आ<span><span>णि</span></span> बहिर्या लोकांकरता बातम्या लागत. तेव्हा वाटे ह्या अशा काय बातम्या आहेत ज्यात ती वृत्त निवेदिका ओठांच्या हालचाली आणि हातवारे करत बातम्या देत आहे. मी जेव्हा ह्या लोकांना इतरांशी संवाद साधताना पहातो तेव्हा मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे आपले बोलणे इतरांना पटवून देण्याचा त्यांचा उत्साह. जो पर्यंत तुम्हाला त्याचं म्हणण कळत नाहि तो पर्यंत ते तुम्हाला समजावत असतात अगदी न थकता.<br /><br />आपण जर इतिहासात डोकावून पाहिल तर ह्या मुक्या आणि बहिर्या लोकांना पुर्वी समाजात अत्यंत नगण्य असं स्थान होत. त्यांना कोठल्याही सामाजिक कार्यक्रमाला यायची पूर्णपणे बंदि होती. साधारण बाराव्या शतकात इस्लामिक हिदायत मध्ये ह्यांच्या वरील बंधन बरीच शिथिल करण्यात आली होती, म्हणजे त्यांना समाजात उठण्या बसण्याचा अधिकार देण्यात आला होता. पण त्या काळात सुद्धा ह्या लोकांशी संवाद साधण्यासाठी ठोस अशी भाषा उपलब्ध असल्याच दिसत नाहि. हिंदू धर्मात हातांच्या विविध हालचालीतून कथा सांगण्या<span><span>ची</span></span> कला अस्तित्वात होती ज्याला मुद्रा असहि म्हणतात पण त्या सुद्धा नृत्य आणि नाटक ह्यांच्या पुरत्याच मर्यादित होत्या. साधारण वीसाव्या शतकात नागा जातीच्या लोकांमध्ये मुक्या आणि बहिर्या लोकांशी संवाद साधण्यासाठी सांकेतिक भाषेचा वापर केला जात असल्याची नोंद मिळते. प्रसिद्ध समाज अभ्यासक जॉन हेन्री हटून लिहितो, "नागा लोकांनी सांकेतिक भाषेत खूपच प्रगती केली आहे. म्हणजे एखादा मुक मनुष्य संपूर्ण कथा आप<span><span>ल्याला</span></span> त्याची भाषा जाणणर्या भाषांतरकाराच्या साहाय्याने सांगु शकतो, एवढच नाहि तर तो त्याच्यावर झालेल्या अत्याचाराची संपूर्ण तक्रार कुठलाही मुद्दा न गाळता करु शकतो. थोडा त्रास होतो तो नावांचा, पण ती सुद्धा वर्णनावरून कळतात." पण हे फक्त ह्या विशिष्ठ जमातीपूर्तच मर्यादित होत, बाकीच्या ठिकाणी अजूनही मुक्या आणि बहिर्या लोकांची दुरावस्थाच होती.<br /><br />पुढे १८३० पासून शाळा आणि अनाथाश्रमातून सांकेतिक भाषा शिकवायला सुरुवात झाली, पण तिला असं काहि प्रमाण शास्त्र नव्हत. एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला मुक्या आणि बहिर्या लोकांकरता खास शाळा सुरु झाल्या. बॉम्बे इन्स्टीट्यूट फॉर डेफ हि पहिली शाळा १८८० साली बिशॉप लिओ मेरीन यांनी मुंबईत सुरु केली. पुढे अशाच प्रकारच्या शाळा त्यावेळचं मद्रास(चेन्नई) आणि कलकत्ता इथे सुरु झाल्या. हे लोण पुढे भारत, पाकिस्तान, आणि श्रीलंकेतल्या बर्याच शहरात पसरलं. त्या काळात ह्या डेफ स्कूलमध्ये ओरालीस्ट म्हणजे ओठां<span><span>च्या</span></span> हालचालींवरुन भाषा शिकवण्यात येत असे. ह्या शाळा हातवार्यांच्या सांकेतिक भाषेचा वापर कर<span><span>त</span></span> नसतं. पण बर्याच विद्यार्थ्यांना हि ओठ वाचण्याची कला अवगत <span><span>व्हायला</span></span> फार कठिण वाटे, तेव्हा ती मुलं शाळेत एकमेकांशी बोलण्या करता हातवार्यांचीच भाषा वापरत, पण ते करण्यापासून त्यांचे शिक्षक त्यांना परावृत्त करत असत. १९२८ साली ब्रिटीश शिक्षिका एच. सी. बॅनर्जी ह्यांच्या हि गोष्ट लक्षात आली. त्यांनी भारतातील तीन विविध शाळांना भेटि दिल्या आणि साधारण सगळ्यांमध्ये समानता असलेली एक सांकेतिक भाषा तयार केली. पुढे हिचच पुनरावलोकन होत IPSL म्हणजे इंडो-पाकिस्तान साईन लँग्वेजेस निर्मिती झाली. IPSL नी सांकेतिक भाषेत व्याकरण आणल, त्यामुळे ती भाषा अधिक शुद्ध आणि समृद्ध होत गेली. IPSL च्याच धर्तीवर ASL(अमेरीकन साईन लँग्वेज) जी मुख्यत्वे अमेरीका आणि मित्र राष्ट्रात वापरली जाते आणि BSL(ब्रिटिश साईन लँग्वेज) हि मुख्यत्वे ब्रिटनमध्ये वापरली जाते ह्या भाषा सार्या विश्वात अवगत आहेत.<br /><br />आज ह्या सांकेतिक भाषेने खूपच प्रगति केली आहे. अगदी एडिसन पासून ते सर. विल्यम मॅकमोहन (जे एके काळि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान होते) हे सगळे मुके किंवा बहिरेच होते पण त्यांनी ह्या सगळ्यावर मात करत आपलं जीवन समृद्ध केलं. मला वाटत तो दिवस आता दूर नाहि ज्यावेळी सांकेतिक भाषा हि प्रत्येक शाळेत मुख्य भाषेच्या दर्जात येऊन बसेल. खरच जर प्रत्येकाला हि सांकेतिक भाषा कळली तर मुका आणि बहिरा हे शब्दच आपल्या भाषेतून नष्ट होतील आणि मला त्या दिवसाची प्रतिक्षा आहे.<br /><br /><span style="font-size:78%;"><span style="font-style: italic;">- </span><span style="font-style: italic;">वरील</span><span style="font-style: italic;"> </span><span style="font-style: italic;">माहिती</span><span style="font-style: italic;"> विकिपीडियाच्या</span><span style="font-style: italic;"></span><span style="font-style: italic;"> </span><span style="font-style: italic;">सौजन्याने</span><span style="font-style: italic;">.</span></span>केदारhttp://www.blogger.com/profile/14884011196968187595noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2172323680266509657.post-71606048666790149222010-11-24T15:35:00.003+05:302010-11-24T16:11:09.482+05:30मुंबईत मराठी FM चा ढोलसाधारण जुलै महिन्यात एक बातमी मीडियावाल्यांनी चघळली (आजकाल हे मिडियावाले हेच करतात), शिवसेना प्रमुखांनी मुंबईतल्या खासगी FM वाहिन्यांना लवकरात लवकर मराठी गाणी ऐकवा नाहितर मिरच्यांची धुरी देऊ अशी गोड धमकी दिली आणि आम्हा मराठी रसिकांमध्ये आनंदाची एक लहर उठली. चला म्हणजे आता तरी आम्हाला मराठी गाणी ऐकायला मिळतील कारण <span>सेना प्रमुखांच्या</span> विरुद्ध जाण्याची मुंबईत तरी कोणाचीच हिंमत नाहि. लगेच अनेक वाहिन्यांनी आश्वासन दिली कि लवकरात लवकर मराठी कार्यक्रम चालु करु. रेडिओ मिर्चिनी तर म्हणे सेना प्रमुखांना पत्रही पाठवल आणि लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी पासून म्हणजे १ ऑगस्ट पासून मराठी कार्यक्रम सुरु करायच आश्वासन दिलं.<br /><br />आज जवळ जवळ चार महिन्यांनंतरच परीस्थीती अशी आहे कि आम्हा मराठी रसिकांना ह्या खासगी वाहिन्यांनी नुसत्याच वाटाण्याच्या अक्षता दिल्यात. रेडिओ मिर्चिनी तर आठवड्यात फक्त दोनच तास मराठीला राखून जणु आमच्यावर मोठे उपकारच केलेत असा अविर्भाव आणला आहे. आता आपण जर मुंबईतल्या FM वाहिन्यांचा पसारा पाहिला तर इथे एकूण ९ FM वाहिन्या आहेत. ह्यातल्या दोन सरकारी म्हणजे आकाशवाणीच्या तर बाकि सात खासगी आहेत. म्हणजे एवढ्या नऊ वाहिन्या असूनही आम्ही मराठी रसिक तहानलेले. आता हेच बघा ना माझ्याच महाराष्ट्रात, माझ्याच मुंबईत मराठीची गळचेपी करायला ह्या दोन सरकारी FM वाहिन्या पण मागे नाहित.<br /><br />आकाशवाणी मुंबईत दोन FM वाहिन्या चालवते FM गोल्ड आणि FM रेन्बो. आता ह्यातली FM रेन्बोचा आणि मराठीचा यत्किंचितही संबंध नाहि. हिचं FM रेन्बो वाहिनी चेन्नई ला चोवीस तास तामिळ, बंगळुरू ला पूर्ण वेळ कन्नड गाणी ऐकवते. जर तुमच्याकडे DTH सेवा असेल तर तुम्ही हे पडताळुन पाहु शकता. म्हणजे बघा खुद्द मायबाप सरकारलाच मराठीची कदर नाहि. दुसरी वाहिनी FM गोल्ड हिची परीस्थीती पण ह्यापेक्षा वेगळी नाहि पण इथे जरा बुडत्याला काठीचा आधार हा प्रकार आहे. आता हि वाहिनी चोवीस तासातले फक्त अठरा तासच चालु असते म्हणजे सक्काळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत. ह्यात मराठी कार्यक्रम लागतात ते फक्त पाच तास, सका<span>ळी</span> दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत. त्यातही दर तासाला दहा मिनिट हिंदि आणि इंग्रजी बातम्या लावतात, म्हणजे इथेही मराठी बातम्यांना डच्चू. आता पहा पाच तासातले सुमारे चाळीस मिनिट तर इतर भाषिक बातम्यांनाच असतात. म्हणजे प्रत्यक्ष मराठी कार्यक्रम फक्त चार तास वीस मिनिटेच चालतो, म्हणजे आमच्या मुंबईत मराठीला एका सरकारी वाहिनीवर स्थान केवढ तर अठरा तासातले फक्त साडेचारच तास. आणि हो हे प्रक्षेपण सुद्धा नियमित नसतं म्हणजे जर क्रिकेटची मॅच असेल तर त्याची रनिंग कॉमेंट्री हि ह्याच वाहिनीवर मराठी कार्यक्रमांची आहुती देऊन ऐकवली जाते, जी FM रेन्बोवरुन पण ऐकवता येऊ शकते. ह्याच वाहिनीवर दुपारी तीन ते चार ह्या वेळात गुजराथी कार्यक्रम ऐकवले जातात, अहमदाबाद मध्ये असं काहि चालत असेल ह्यावर माझा तरी विश्वास नाहि. आता हि रड झाली सरकारी वाहिन्यांची, मराठी कार्यक्रमांकडे पाठ फिरवायची सरकारी वाहिन्यांची कारण अजुन तरी समोर आलेली नाहित.<br /><br />जिथं कुंपणच शेत खात तिथ बाकीच्यांची काय तहा. इथल्या खासगी वाहिन्या तर मराठीवर पूर्णपणे बहिष्कार टाकल्या सारख्याच वागतात. मराठी गाणी ऐकवण त्यांना म्हणे डाऊन मार्केट वाटत, किती संताप येतो ना हे ऐकुन पण. ह्यांना ती टुकार पंजाबी गाणी लावायची लाज वाटत नाहि पण मराठीची मात्र लाज वाटते म्हणजे आमच्याच घरात राहुन आमचीच लाज वाटते. असं जरा चेन्नई मध्ये बोलून दाखवा म्हणजे काय हालत होईल ते कळेल. सेना प्रमुखांचा मान राखण्यासाठी मिरची वाल्यांनी रविवारी दुपारी बारा ते दोन ह्या वेळात मुंबई ढोल हा कार्यक्रम सुरु केला, पण हाच कार्यक्रम हे लोक रोज का नाहि ऐकवु शकत ह्याच उत्तर <span>मिरची</span><span>वाले</span> (किंवा राजकारणी) लोकच देऊ शकतील. एक दुसरी वाहिनी बीग FM यांनी मराठी म्युझिक अवॉर्ड, मराठी बीगिज असे पुरस्कारांचे कार्यक्रम आयोजित करायला सुरुवात केली आहे कारण त्याला प्रयोजक मिळतात ज्यातून भरपूर पैसा मिळतो. आणि हो आम्ही मराठीचा उदो करतो आहे हेही दाखवून देता येत, पण ह्यांना आपल्या रेडिओ वाहिनीवर मराठी कार्यक्रम ऐकवायची लाजच वाटते. ह्या खासगी वाहिन्या चोवीस तास कार्यक्रम प्रसारित करत असतात पण त्यातले दोन तासही मराठीला त्यांना द्यायची गरज वाटत नाहि. आता ह्या वाहिन्यांवरील रेडिओ जॉकि हेहि मराठी नसतात तेही इतर भाषिक असतात, पण तुम्ही जर ह्या वाहिन्यांच्या वेबसाईटवर जाउन पाहिल तर कोलकत्याच्या ह्यांच्याच वाहिनीवर सगळे रेडिओ जॉकि हे बंगालीच असतात मग आमच्या मराठी माणसात वाक्चातुर्य नाहि असं ह्यांना वाटत का? इंग्रजाळलेल्या हिंदीत अत्यंत बाष्कळ विनोद करत हे रेडिओ जॉकि कार्यक्रम सादर करत असतात, अर्थात ह्याला काहि अपवादही आहेत. पण एकंदरीतच हि परिस्थिती खूपच भिषण आहे. मी मुंबईचा असल्यामुळे महाराष्ट्रातल्या इतर शहरात काय <span>परिस्थिती</span> आहे ह्याची मला कल्पना नाहि.<br /><br />मला अजुन कळत नाहि मराठीच ’राज’कारण करणाऱ्या ह्या राजकारण्यांना हि बाब अजुन कशी लक्षात <span>आ</span><span>ली</span> नाहि का ते जाणून बुजून मुग गिळुन बसले आहेत? आपण म्हणतो मराठी चित्रपट चालत नाहित. आहो मुंबईत नवीन मराठी गाणी पण आलेली कळत नाहित. आज मुंबईतल्या बहुतांश लोकांची नाळ ह्या FM रेडिओशी जोडली गेली आहे. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये FM रेडिओची सोय असते त्यामुळे बसमध्ये, रेल्वे गाडीत, कारमध्ये, घरात, अहो रस्त्यांवरून चालताना सुद्धा लोक हा FM रेडिओ ऐकत असतात. तेव्हा अशा ह्या हुकमी माध्यमावर मराठीला संधी मिळाली तर नक्कीच मराठीची जी पिछेहाट चालली आहे त्याला कुठेतरी आळा बसेल. आज मराठी दूरचित्रवाणीचा TRP हिंदी दूरचित्रवाणीच्या तुलनेत कितीतरी जास्त आहे हे ह्या खासगी वाहिन्यानी लक्षात घ्याव. आहो एवढच कशाला महाजालावर पण मराठी वेबसाईटना व्हिजिट देणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मग FM रेडिओच्या बाबतीत हा सावत्रपणा का?<br /><br />मला खात्री आहे लवकरच हे चित्र बदलेल आणि मुंबईतल्या सगळ्या FM वाहिन्या अमृताते पैजा जिंकणा<span>ऱ्या</span> मराठीला तिचा मान देतील. पण तो सोनेरी दिवस कधी उगवेल हे देवच जाणे. मला त्या उज्ज्वल दिवसाची प्रतिक्षा आहे. तुम्हाला काय वाटत?केदारhttp://www.blogger.com/profile/14884011196968187595noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-2172323680266509657.post-38259096336973205712010-09-18T21:08:00.009+05:302010-09-20T22:02:25.521+05:30बाप्पा मोरया !!!<div style="text-align: justify;"><span>खूप</span> <span>दिवसांपासून</span> <span>ज्याची</span> <span>वाट</span> <span>पहात</span> <span>होतो</span> <span>तो</span> <span>गणेशोत्सव</span> <span>आता</span> <span>सुरू</span> <span>झाला</span> <span>आहे</span>. <span>म्हणजे</span> <span>मुंबईसारख्या</span> <span>शहरांमध्ये</span> <span>तर</span> <span>बहुतेक</span> <span>घरातल्या</span> <span>गणेशाचे</span> <span>विसर्जन</span> <span>पण</span> <span>झाले</span> <span>आहे</span>. <span>साधारण</span> <span>ऑगस्ट</span> <span>महिना</span> <span>सुरु</span> <span>झाला</span> <span>कि</span> <span>आपल्याला</span> <a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhQXSve7Wpv29Ql1j20CnIAPm9Ljees0JU9OZJgeB-d1CrQgMBoFRqudWF-hBIizr1qG9zJNMWnaVc8G81ezZQmIqYglowBiDo2r2TO9P6bn4PednlriqDQsvHMxuAz7UZMITD9NdH-T00/s1600/IMG_2203.JPG"><img style="margin: 0pt 10px 10px 0pt; float: left; cursor: pointer; width: 200px; height: 150px;" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhQXSve7Wpv29Ql1j20CnIAPm9Ljees0JU9OZJgeB-d1CrQgMBoFRqudWF-hBIizr1qG9zJNMWnaVc8G81ezZQmIqYglowBiDo2r2TO9P6bn4PednlriqDQsvHMxuAz7UZMITD9NdH-T00/s200/IMG_2203.JPG" alt="" id="BLOGGER_PHOTO_ID_5518524746822451314" border="0" /></a><span><span>बाप्पांची</span></span> <span>चाहूल</span> <span>जाणवू</span> <span>लागते</span>. <span>ठिकठिकाणी</span> <span>मुर्तींची</span> <span>दुकान</span> <span>मांडली</span> <span>जातात</span>. <span>मग</span> <span>आपली</span> <span>आवडती</span> <span>श्रींची</span> <span>मुर्ती</span> <span><span>निवडुन</span></span> <span>ती</span> <span>लवकरात</span> <span>लवकर</span> <span>बुक</span> <span>करणे</span> <span>सगळ्यात</span> <span>महत्वाच</span>. <span>एकदा</span> <span>का</span> <span>मुर्ती</span> <span>बुक</span> <span>झाली</span> <span>कि</span> <span>मग</span> <span>दुसर</span> <span>काम</span> <span>म्ह</span><span><span>णजे</span></span> <span>मुख्य</span> <span>दिवसाकरता</span> <span>गुरुजी</span>(<span>भटजी</span>) <span><span>शोधण</span></span>. <span>काहि</span> <span>ठिकाणी</span> <span>परंपरागत</span> <span>ठरलेले</span> <span>गुरुजी</span> <span>असतात</span>, <span>पण</span> <span><span>ज्यांच्याकडे</span></span> <span>अशी</span> <span>सोय</span> <span>नाहि</span> <span>त्यांना</span> <span>मात्र</span> <span>हे</span> <span>गुरुजी</span> <span>मिळण</span> <span>फार</span> <span>मुश्किलीच</span> <span>काम</span> <span>असतं</span>. <span>हल्ली</span> <span>तर</span> <span>बरेचजण</span> <span>सरळ</span> <span>सीडी</span> <span>लावुन</span> <span>पुजा</span> <span>करुन</span> <span>घेतात</span>. <span>मग</span> <span>एकदा</span> <span>का</span> <span>मुर्ती</span> <span>आणि</span> <span>गुरुजी</span> <span>बुक</span> <span>झाले</span> <span>कि</span> <span>मग</span> <span>पुढची</span> <span>तयारी</span> <span>सुरु</span> <span>होते</span> <span>ती</span> <span>म्हणजे</span> <span>सजावटिची</span>. <span>सार्वजनीक</span> <span>ठिकाणी</span> <span>तर</span> <span>मोठे</span> <span>मोठे</span> <span>मंडप</span> <span>घातले</span> <span>जातात</span> <span>आणि</span> <span>श्रींच्या</span> <span>सजावटिची</span> <span>तयारी</span> <span>सुरु</span> <span>होते</span>.<br /><br /><span>ह्यावर्षी</span> <span>गणपती</span> <span>आणि</span> <span>ईद</span> <span>जोडूनच</span> <span>आल्यामुळे</span> <span>गणपतीच्या</span> <span>आदल्या</span> <span>दिवशी</span> <span>छान</span> <span>सुट्टी</span> <span>मिळाली</span> <span>त्यामुळे</span> <span>तयारी</span> <span>करायला</span> <span>भरपूर</span> <span>वेळ</span> <span>होता</span>. <span>तसं</span> <span>पण</span> <span>आजकालच्या</span> <span>धकाधकीच्या</span> <span>जीवनात</span> <span>तयारी</span> <span>हि</span> <span>आदल्या</span> <span>दिवसापासूनच</span> <span>सुरु</span> <span><span>होते</span></span>. <span>पण</span> <span>ह्यावर्षी</span> <span>हक्काची</span> <span>सुट्टी</span> <span>मिळाल्यामुळे</span> <span>सकाळी</span> <span>उठून</span> <span>दुसर्</span><span>या</span> <span>दिवशी</span> <span>लागणार</span> <span>पूजेचं</span> <span>साहित्य</span>, <span>मग</span> <span>सजावटीचे</span> <span>साहित्य</span> <span>असं</span> <span>सगळ</span> <span>विकत</span> <span>आणल</span>. <span>पण</span> <span>खरी</span> <span>सजावटिला</span> <span>सुरुवात</span> <span>संध्याकाळीच</span> <span>केली</span>, <span>रात्री</span> <span>उशीरापर्यंत</span> <span>जागून</span> <span>सजावट</span> <span>पूर्ण</span> <span>केली</span> <span>तेव्हा</span> <span>कुठे</span> <span>झोप</span><a onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}" href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgsW9N_d0uYz-oQ0-pNswbdEHjVmv_IYFr4-dsQUjw8RSf-sNmfihP1_fRF5HKj5gAxBpVo1utt4UImk00Zas0P5lLSySgOv7s-aFNhgVmdjeN04lz0u577-wFk6w172DSL6mLDkABAI64/s1600/IMG_2209.JPG"><img style="margin: 0pt 0pt 10px 10px; float: right; cursor: pointer; width: 200px; height: 150px;" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgsW9N_d0uYz-oQ0-pNswbdEHjVmv_IYFr4-dsQUjw8RSf-sNmfihP1_fRF5HKj5gAxBpVo1utt4UImk00Zas0P5lLSySgOv7s-aFNhgVmdjeN04lz0u577-wFk6w172DSL6mLDkABAI64/s200/IMG_2209.JPG" alt="" id="BLOGGER_PHOTO_ID_5518531564938357586" border="0" /></a> <span>लागली</span>. <span>शनिवारी</span> <span>सकाळी</span> <span>साधारण</span> <span>दहा</span> <span>वाजेपर्यंत</span> <span>श्रींची</span> <span>मुर्ती</span> "<span>बाप्पा</span> <span>मोरयाचा</span>" <span>जयघोष</span> <span>करत</span> <span>घरी</span> <span>आणली</span>, <span>तोवर</span> <span>गुरुजी</span> <span>आलेच</span> <span>होते</span>. <span>मग</span> <span>गुरुजींच्या</span> <span>मार्गदर्शनाखाली</span> <span>मोठ्या</span> <span>मनोभावे</span> <span>श्रींची</span> <span>प्रतिष्ठापना</span> <span>केली</span>, <span>आरती</span> <span>करुन</span> <span>श्रींना</span> <span>विविध</span> <span>पदार्थ</span> <span>असलेल</span> <span>सुग्रास</span> <span>जेवण</span> <span>आणि</span> <span>२१</span> <span>उकडीच्या</span> <span>मोदकाचा</span> <span>नैवेद्य</span> <span>दाखवला</span>. <span>उकडीचे</span> <span>मोदक</span> <span>म्हणजे</span> <span>बाप्पांचा</span> <span>आवडता</span> <span>पदार्थ</span>, <span>खरच</span> <span>जसे</span> <span>बाप्पा</span> <span>आपल्याला</span> <span>विशेष</span> <span>तसा</span> <span>त्यांचा</span> <span>हा</span> <span>आवडता</span> <span>पदार्थही</span> <span>विशेषच</span>. <span>माझ्यामते</span> <span>असा</span> <span>कुणीच</span> <span>नसेन</span> <span>ज्याला</span> <span>उकडीचे</span> <span>मोदक</span> <span>म्हटल</span> <span>कि</span> <span>तोंडाला</span> <span>पाणी</span> <span>सुटत</span> <span>नसेल</span>. <span>मग</span> <span>दुपारची</span> <span>छान</span> <span>जेवण</span> <span>झाली</span>, <span>मोदकांवर</span> <span>मनसोक्त</span> <span>ताव</span> <span>मारल्यावर</span> <span>एक</span> <span>छान</span> <span>वामकुक्षी</span> <span>झाली</span>. <span>संध्याकाळि</span> <span>बाप्पाच्या</span> <span>दर्शनाला</span> <span>येणार्</span><span>या</span> <span>लोकांचा</span> <span>राबता</span> <span>सुरु</span> <span>झाला</span> <span>तो</span> <span>पुढचे</span> <span>पाच</span> <span>दिवस</span> <span>सुरुच</span> <span>होता</span>.<br /><br /><span>अशा</span> <span>या</span> <span>उत्साहपूर्ण</span> <span>वातावरणात</span> <span>गुरुवार</span> <span>कधी</span> <span>आला</span> <span>कळलच</span> <span>नाहि</span>, <span>सकाळपासून</span> <span>खूपच</span> <span>उदास</span> <span>वाटत</span> <span>होत</span> <span>कारण</span> <span>आज</span> <span>बाप्पाच्या</span> <span>विसर्जनाचा</span> <span>दिवस</span> <span>होता</span>. <span>गेले</span> <span>पाच</span> <span>दिवस</span> <span>घरातला</span> <span>एक</span> <span>माणूसच</span> <span>बनून</span> <span>राहिलेले</span> <span>बाप्पा</span> <span>त्यांच्या</span> <span>घरी</span> <span>जाणार</span> <span>होते</span>. <span>आज</span> <span>बाप्पांना</span> <span>तळलेल्या</span> <span>मोदकाचा</span> <span>नैवेद्य</span> <span>होता</span>. <span>दुपारची</span> <span>जेवण</span> <span>झाल्यावर</span> <span>साधारण</span> <span>चार</span> <span>वाजता</span> <span>गुरुजी</span> <span>आले</span> <span>ते</span> <span>उत्तरपूजा</span> <span>सांगण्याकरता</span>. <span>उत्तरपूजा</span> <span>सांगून</span> <span>झाल्यावर</span> <span>श्रींच्या</span> <span>नावाचा</span> <span>जयघोष</span> <span>करत</span> <span>आणि</span> <span>त्यांना</span> <span>पुढच्या</span> <span>वर्षि</span> <span>लवकर</span> <span>या</span> <span>असं</span> <span>आमंत्रण</span> <span>देत</span> <span>जवळच</span> <span>असलेल्या</span> <span>खाडीत</span> <span>विसर्जन</span> <span>केल</span>. <span>बाप्पा</span> <span>गेले</span> <span>पण</span> <span>जाताना</span> <span>पुढच्या</span> <span>वर्षि</span> <span>लवकर</span> <span>यायची</span> <span>साद</span> <span>देऊन</span> <span>गेले</span>.<br /><br /><span>गणपती</span> <span>बाप्पा</span> <span>मोरया</span> !!!</div>केदारhttp://www.blogger.com/profile/14884011196968187595noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-2172323680266509657.post-90874392254857438702010-09-14T14:03:00.003+05:302010-09-14T17:57:08.832+05:30"<a href="http://mekedar.blogspot.com/"><span>आशयघन</span></a>" <span>ह्या</span> <span>माझ्या</span> <span>नवीन</span> <span>ब्लॉगवर</span> <span>आपले</span> <span>सहर्ष</span> <span>स्वागत</span>. <span>प्रथम</span> <span>आपण</span> "<a href="http://kedusworld.blogspot.com/"><span>माझ्या</span> <span>विश्वात</span>..</a>" <span>ला</span> <span>दिलेल्या</span> <span>उदंड</span> <span>प्रतिसादाबद्दल</span> <span>धन्यवाद</span>!. <span>खरतर</span> <span>हा</span> <span>नवीन</span> <span>ब्लॉग</span> <span>चालु</span> <span>करायच</span> <span>प्रयोजनच</span> <span>मुळी</span> <span>लिखाणातल</span> <span>माझं</span> <span>वाढलेल</span> <span>धाडस</span>. <span>दोन</span> - <span>अडीच</span> <span>वर्षांपूर्वी</span> <span>जेव्हा</span> "<a href="http://kedusworld.blogspot.com/"><span>माझ्या</span> <span>विश्वात</span>..</a>" <span>सुरु</span> <span>केला</span> <span>तेव्हा</span> <span>मनात</span> <span>यत्किंचितही</span> <span>विचार</span> <span>नव्हता</span> <span>कि</span> <span>मी</span> <span>हा</span> <span>प्रवास</span> <span>इथपर्यंत</span> <span>चालु</span> <span>ठेवीन</span>. <span>मजा</span> <span>म्हणून</span> <span>सुरुवात</span> <span>केलेल्या</span> <span>लिखाणच</span> <span>आवडीत</span> <span>कधी</span> <span>रुपांतर</span> <span>झाले</span> <span>कळलच</span> <span>नाहि</span>. <span>बरच</span> <span>सुचत</span> <span>असत</span>, <span>लिहावस</span> <span>वाटत</span> <span>पण</span> <span>वेळेअभावी</span> <span>राहुन</span> <span>जात</span>. <span>आता</span> <span>जेव्हा</span> <span>मागे</span> <span>वळून</span> <span>पाहतो</span> <span>तेव्हा</span> "<span>माझ्या</span> <span>विश्वात</span>.." <span>चा</span> <span>सगळा</span> <span>प्रवास</span> <span>अगदी</span> <span>डोळ्यासमोरून</span> <span>जातो</span> <span>आणि</span> <span>खूप</span> <span>छान</span> <span>वाटत</span>.<br /><br /><span>आता</span> <span>थोडं</span> "<a href="http://mekedar.blogspot.com/"><span>आशयघन</span></a>" <span>ह्या</span> <span>नावा</span> <span>विषयि</span> "<span>आशय</span>" <span>म्हणजे</span> <span>अर्थ</span> <span>त्यामुळे</span> <span>ह्या</span> <span>ब्लॉगवर</span> <span>काहीतरी</span> <span>अर्थपूर्ण</span> <span>लिखाण</span> <span>कराव</span> <span>असा</span> <span>मानस</span> <span>आहे</span>. <span>म्हणजे</span> <span>सध्या</span> <span>डोक्यात</span> <span>अशी</span> <span>कल्पना</span> <span>आहे</span> <span>कि</span> "<a href="http://kedusworld.blogspot.com/"><span>माझ्या</span> <span>विश्वात</span>..</a>" <span>हा</span> <span>संपूर्णपणे</span> <span>ललित</span> <span>लिखाणावर</span> <span>अधारीत</span> <span>असेल</span> <span>तर</span> "<a href="http://mekedar.blogspot.com/"><span>आशयघन</span></a>" <span>मध्ये</span> <span>ललित</span> <span>लिखाणा</span> <span>शिवाय</span> <span>इतर</span> <span>लेख</span> <span>प्रसिद्ध</span> <span>करण्याचा</span> <span>आग्रह</span> <span>असेल</span>.<br /><br /><span>माझ्या</span> <span>ह्या</span> <span>नवीन</span> <span>प्रयत्नाला</span> <span>आपल्या</span> <span>शुभेच्छा</span> <span>आणि</span> <span>आशीर्वाद</span> <span>असतीलच</span> <span>ह्याची</span> <span>मला</span> <span>पूर्णपणे</span> <span>खात्री</span> <span>आहे</span>.केदारhttp://www.blogger.com/profile/14884011196968187595noreply@blogger.com0